Sunday 16 September 2012

असच...


"मी हरलोय" अस म्हणू नकोस,
"यावेळी हरलोय" अस म्हण कारण 
पुन्हा जिंकण्यासाठी असे येतील कितीतरी क्षण...!

"एकटा उरलो"अस म्हणू नकोस,
"सध्या एकटा आहे अस म्हण कारण 
या सुंदर आयुष्यात भेटायाचेत अजून काहीं जण...!


"मी थकलोय" अस म्हणू नकोस,
"जरा दम घेतोय",म्हण कारण
पुन्हा उठायचय झेप घेण्यासाठी जेव्हा पेटून उठेल एकेक कण...!

                                               -अनामिक

Monday 10 September 2012

देवाच वचन...

देवाने वचन नाही दिलेलं 

नेहमीच निळ्याशार आकाशाचं
 
आयुष्यभर
 
फुलांनी भरगच्च अशा मार्गाचं.

देवाने वचन  नाही दिलेलं 

पावसाशिवाय सोनेरी सूर्याचं

दुखाशिवाय सुखाचं आणि वेदनेशिवाय शांतीच...


नेहमीच मिळणार नाही 

चालायला 

सरळ आणि प्रशस्त वाट,

साधा सोपा असा निर्भिस्त प्रवास किंवा 

एखादा पर्वत जो पार करायला सहज 
 
अथवा 

नदी जी वाहते उथळ तरीही शांत...


पण हो,देवाने वचन दिलंय,

दिवसापुरत्या शक्तीचं,

कष्टानंतर विश्रांतीच 

प्रयत्नांती फळाच,

अदृश्य मदतीच्या हाताचं,

न संपणाऱ्या करुणेच आणि 

अमर अशा प्रेमाचं