"मी हरलोय" अस म्हणू नकोस,
"यावेळी हरलोय" अस म्हण कारण
पुन्हा जिंकण्यासाठी असे येतील कितीतरी क्षण...!
"एकटा उरलो"अस म्हणू नकोस,
"सध्या एकटा आहे अस म्हण कारण
या सुंदर आयुष्यात भेटायाचेत अजून काहीं जण...!
"मी थकलोय" अस म्हणू नकोस,
"जरा दम घेतोय",म्हण कारण
पुन्हा उठायचय झेप घेण्यासाठी जेव्हा पेटून उठेल एकेक कण...!
-अनामिक